पाऊस आला की,
सुचते न कविता
आठवतो तुही आणि
ती भेटही..!
तेव्हा मोडलेली छत्री सांभाळत
तुझ्यापर्यंत पोहचली होती
न भिजता कशीतरी
तुही आला होतास
तसाच कोरडा!
का भेटलो?
काय बोललो?
पडद्याआड सर्व
पण भिजलं होतं भेटीत मन
आणि परतताना शरीरही...
मोडलेल्या छत्रीमध्ये तेवढं सामर्थ्य
नसावं कदाचित..
दुराव्याचा मारा सहन करायची..!!
मला फक्त तेवढंच आठवतं,
त्या पावसाळ्यात कविता नाही
पण मी भिजली होती..
आणि तेव्हा पासून
पाऊस आला की,
सुचते न कविता
आठवतो तुही आणि
ती भेटही..!
सुचते न कविता
आठवतो तुही आणि
ती भेटही..!
तेव्हा मोडलेली छत्री सांभाळत
तुझ्यापर्यंत पोहचली होती
न भिजता कशीतरी
तुही आला होतास
तसाच कोरडा!
का भेटलो?
काय बोललो?
पडद्याआड सर्व
पण भिजलं होतं भेटीत मन
आणि परतताना शरीरही...
मोडलेल्या छत्रीमध्ये तेवढं सामर्थ्य
नसावं कदाचित..
दुराव्याचा मारा सहन करायची..!!
मला फक्त तेवढंच आठवतं,
त्या पावसाळ्यात कविता नाही
पण मी भिजली होती..
आणि तेव्हा पासून
पाऊस आला की,
सुचते न कविता
आठवतो तुही आणि
ती भेटही..!
एक सावली