Saturday 30 June 2018

कोरडा!

पाऊस आला की,
सुचते न कविता
आठवतो तुही आणि
ती भेटही..!

तेव्हा मोडलेली छत्री सांभाळत
तुझ्यापर्यंत पोहचली होती
न भिजता कशीतरी
तुही आला होतास
तसाच कोरडा!
का भेटलो?
काय बोललो?
पडद्याआड सर्व
पण भिजलं होतं भेटीत मन 
आणि परतताना शरीरही...
मोडलेल्या छत्रीमध्ये तेवढं सामर्थ्य
नसावं कदाचित..
दुराव्याचा मारा सहन करायची..!!

मला फक्त तेवढंच आठवतं,
त्या पावसाळ्यात कविता नाही
पण मी भिजली होती..
आणि तेव्हा पासून

पाऊस आला की,
सुचते न कविता
आठवतो तुही आणि
ती भेटही..!


एक सावली 

"पण, किती दिवस.. ??"

कित्येकदा बोलते तुझ्याशी
मनातल्या मनात घोकत सर्व..
तुझं ताडताड निघून जाणं,
आणि
आपला असा अबोला
कोणता प्रश्न सुटणार आहे बरं?
फक्त दुरावा वाढतोय..!!
किती सरळ आहे..

तुला अभिमान वाटायला हवा खरं तर..!!!
स्वतःच अस्तित्व,
          मान,
          सन्मान शाबूत ठेवण्याचा अट्टहास-
वारसा हक्काने जपते आहे मी..!!
या सर्वात,
तू मला नेहमीसाठी
हरवून बसू नये फक्त..!!
कारण,
तू तोडून निघून गेलास रे-
मी तात्कळत बसली आहे इथे-
डोळ्यातले अश्रू गळू नये म्हणून,
खंबीरतेचा आव आणत--
"पण, किती दिवस.. ??" 




एक सावली