तो कसाई वरती फेकत असतो
ते सडत असलेले उरलेले मटणाचे तुकडे
आणि
आकाशातली घार उंची सोडून खाली ते झेलायला येते
तिच्या तोंडून खाली पडतात काही तुकडे
आणि
त्या खाली पडणाऱ्या तुकड्यांसाठी धावत असतात काही कुत्रे .
..वैभव गुणवंत भोयर
कविता एक दुवा असतो.एका मनाचा दुसऱ्या मनाशी.समजला तर गवसला नाही तर हरवला.. लिहावे जे सुचते ते,नवीन अनुभव जोडले जातात त्यांनी.!!