पण नियती..!! तिचा खेळ आपण कधीच ओळखू शकत नाही..!! भविष्याची स्वप्ने ती दोघे रंगवत होती, नियतीच्या डावा पासून- अनभिज्ञ..!!
आणि एक दिवस, त्याचा मोबाईल बंद होता,तिच्या एक्झाम मुळे गेली १५ दिवस ती त्याच्याशी बोलली नव्हती,एक्झाम संपली आणि पहिला कॉल त्यालाच केला आणि मोबाईल बंद..!! “कसं शक्य आहे..??, काय झाल..??” तेव्हा हजार शंका-कुशंका पेटल्या होत्या..!!
त्याच्या घरी गेली, दाराला भलमोठ कुलूप. “का..?? कुठे गेला..?? जाताना कुणी कुणाला काही सांगितलंच नाही..!!”
तेव्हाच्या या प्रश्नांना तिनी त्यानंतर रोज उत्तरे शोधायचा प्रयत्न केला, पण कुठे काही सापडतच नव्हत.. काय झाल पंधरा दिवसात कुणालाही कशाचाच थांगपत्ता लागत नव्हता..!!
ती वाट पहात राहिली, नंतरचे पंधरा दिवस, एक महिना, तीन महिने, तिचा निकाल लागला ती पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला आली. कुण्याच्या येण्या-जाण्याने आयुष्य संपत नाही, आयुष्य नदीसारखं प्रवाही असतं,अडखळत पण थांबत नाही..!
पुण्याला आली, त्याच्या बंद नंबर वर रोजचा एक कॉल ठरलेला,चुकून तरी त्याला कॉल लागेल, उचलेल तो,कुठे आहे सांगेल.. अशीच आणखी पुढची ३ महिने निघून गेली.!
आणि आज त्याच मयंक चा कॉल..!!!!
त्याला भेटली तेव्हाची ती, त्यानी सोडली तेव्हाची ती, आणि आज पुन्हा भेटणार तेव्हाची ती..!! तो येईपर्यंत ती कठोर झाली होती..!! तिच्या आईने कॉल करून सांगितले तेव्हापासून ती वेड्यासारखी आपल्या मोबाईल कडे टक्क डोळे लावून बसली होती..!!
डोक्यात आणि मनात शून्य विचार होते, सर्व भावना सुन्न झाल्या होत्या ती निर्जीव झाली होती..!!
सायंकाळी आठ वाजता त्या बंद नंबर वर कॉल करायच्या सवयीने तिनी हातात मोबाईल घेतला आणि अनोळखी नंबर वरून कॉल आला! तिला खात्री पटली हा तोच आहे, हृदयाचे ठोके वाढले, डोळ्यात आसवे तरळली. तिच्या नकळत तिनी तो कॉल उचलला, तिला काही बोलायची गरज नव्हती आणि तिनी काही बोलावे अशी त्याची अपेक्षाही नव्हती. त्या दोघांमधली शांतताच बरच काही बोलून गेली..!!
एकमेकांचे आवाज ऐकण्यासाठी दोघही आतुर झाले होते पण शांतात जास्त हवीशी वाटत होती,पण समोरची व्यक्ती रडत नसावी ही इच्छा दोघेही मनात घेऊन होते..
शांतता तोडत तो म्हणाला, “रागावली आहेस..??” तेव्हा तिनी फक्त नाही अशी मान हरवली, त्याला दिसणार तर नव्हतेच,पण शब्द तर जणू तिच्या साठी हरवलेच होते..!!
तोच पुढे म्हणाला, “ बोलणार नाहीस..?? खूप काही बोलायचं आहे ना..?? खूप काही विचारायचं आहे ना..?? तुझ्याच प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी कॉल केला आहे मी आज..!!मी कुठे गेलो असा..?? काय झाल कि अचानक नाहीसा झालो, वैगेरे.. प्रश्न आज माझ्या साठी महत्वाची नाहीत, फक्त एक गोस्ट नक्की तुला दुखवायचे म्हणून मी यातले काहीही केले नाही. मजबुरी होती माझी..!!इतके दिवस मी तुझ्या शिवाय कसा जगलो याचे स्पष्टीकरण द्यायची मला गरज नाहीये, फक्त एकच सांगेन खूप कमी वेळ राहिला आहे माझ्याजवळ..!! मी तुला धोका वैगेरे दिला असे वाटू नये म्हणून मी हा कॉल केलेला आहे..”
तो बोलताना ओघळणारे अश्रू, कानावर पडणारे त्याचे शब्द आणि गेल्या सहा महिन्यात अधे-मधे त्याच्या बद्दलच्या ऐकलेल्या काही अफवा यांचे संदर्भ ती लावत होती. आणि या संदर्भातून गेल्या सहा महिन्यातली एक शृंखला जुळली होती..!! आणि आताशा तिला ‘माझ्या जवळ जास्त वेळ नाही’ चा अर्थ समजला होता..!
त्याचे बोलणे मध्येच थांबवून ती, “आता आहेस कुठे तू..?? मी येते तिथे,बाकी काहीही बोलू नकोस..!!” तिच्या आवाजानी तो अगदीच तृप्त झाला..!!
तो, “काय करणार तू हे सर्व माहिती करून..!! काय करणार तू माझ्याजवळ येऊन..!! उलट त्यानी सर्व गोष्टी कठीण होऊन जातील दोघांसाठीही..!!”
ती हे सर्व समजण्याच्या मन:स्थितीच नव्हती..!! ती, “मला हे काहीही माहिती नाही, तू फक्त मला सांग..!!”
त्याला भेटण्याचा आवेग किती दाटला हे तिचे तिलाच माहिती,तिनी भेटावे ही तीव्र इच्छा असतानाही नाही म्हणतानाचा त्रास त्यालाच माहिती..!!
पुन्हा दोघातील शांततेचा भंग करताना तो, “आजही आवडतो मी..?? आजही प्रेम करते माझ्यावर..??”
ती, “नाही..!! नाहीच करत..!! तुझ्यावर प्रेम करण्यासाठी काही कारण ठेवलय का तू..??”
तो, “माझ्याजवळ जीतके दिवस राहिलेत तितके दिवस रोज मी तुला हा प्रश्न विचारणार.. कुठलही कारण असावं असं आपलं प्रेम नव्हतच..!! तेव्हा मी प्रेम व्यक्त केलं होत आता तुला करायचे आहे..!! तू जे आता बोललीस ते फक्त रागात हे समजतय मला, फक्त राग बाजूला ठेवून म्हण कि तू आजही प्रेम करतेस माझ्यावर..!! U still love me...!!”
ती, “नाही करत..!! नाहीच..!!”
दबलेला हुंदका निघालाच, तोही अश्रूमय झाला..!!
तो, “उद्या बोलू.. करतो कॉल..”
पण नियती..!! नियतीचा खेळ..!! तिच्या प्रत्येक डावापासून अनभिज्ञ असतो आपण..!!
त्याचा कॉल ठेवून जास्तीत-जास्त एक तास झाला असेल, तिच्या चुलत भावाचा sms आला, “Mayank is no more”
तिच्यावर आभाळ फाटल्यासारख ओझं कोसळलं – न बोललेल्या शब्दांचे, असतानाही व्यक्त न केलेल्या प्रेमाचे..!
तो गेला..!!सर्व संपल..!! उद्या बोलताना हे बोलेल ते बोलेल अशी रंगलेली स्वप्ने अशी क्षणात तुटली..!! त्याच्या मृत्युनंतर ती ओक्साबोक्सी रडेल असे तिलाही वाटत होते पण तिची इच्छा असतानाही डोळ्यातून एकही अश्रू गळत नव्हता..!!
त्याला फक्त “I Love You” ऐकायचे होते आणि ती फक्त हेच बोलू शकली नाही..!! तिला फक्त तिरस्कार जाणवत होता, स्वत:चा, न बोलल्याचा, बोलल्याचा, प्रेमाचा ,शब्दांचा आणि स्वत:च्याच रागाचा..!!
या तिरस्काराखाली मात्र एक मन ओरडून ओरडून सांगत होते, “I Love You..!! I Really Do..!!”