Wednesday 26 March 2014

बाजार

“बघितलस का..?? ती मुलगी, लाल साडीतली, नवरदेवाची चुलत बहिण, ती म्हणत होतो मी, आपल्या चिरंजीवासाठी, आवडली का तुला ती..?? ”, आपल्या श्रीमतीला लग्नाच्या भरगर्दीत ती लाल साडीतली मुलगी दाखवायची धडपड श्रीमान करत होते.
“नाही हो..!! तीच नाक पहा कस आहे..!! तिच्यापेक्षा ती निळ्या सलवार मधली बघा कशी सुंदर आहे. अगदी नाकी-डोळी नीटस..!! ”, श्रीमानानी सांगितलेली मुलगी नकारत श्रीमती ला दुसरीच कुणी आवडते..
दोघेही आपल्या चिरंजीवाला, “बघ, ह्या लग्नात तरी एक मुलगी पसंत कर..!! आम्ही काही पाहून ठेवल्यात, ती लाल साडी आणि नीळा सलवार, नवरदेवाच्या मागे उभ्या आहे त्या. किंवा तिकडे कोपऱ्यात पण छान आहेत काही मुली, सांग कुठली आवडते का ते, म्हणजे बोलणी पुढे नेऊ..!!

जवळपास मी attend केलेल्या सर्व लग्नात कुठे ना कुठे अश्या किंवा अश्या आशयाचे बरेच संभाषण ऐकण्यात आली. त्यातले काही ऐकून तर अंगावर काटा उभा राहिलेला आजही आठवतो. मुलीला तिच्या नावावरून ओळखण्या पेक्षा तिच्या appearance वरून तिची ओळख केली गेली..! ही नाही तर ती, ती नाही तर दुसरी ती, अश्या choices ठेवून किती तरी आईंना त्यांच्या चिरंजीवाशी बोलताना मी ऐकलंय..!! 
आणि हे लाडके चिरंजीव काही अनपड किंवा नासमज नसतात, चांगले शिकलेले पदवीधर असतात..!! त्यानाही मी ‘नाही ती नको ती इतरते आहे.’, ‘नको तिचे केस काळे नाहीत’, ‘ती थोडी जाड आहे’, ‘ती भलतीच बारीक आहे.’ ‘तिचा रंग सावळा आहे.’, ‘ती फारच खेडूत आहे.’ अशा आणि अनेक कारणांवरून मुलींची खिल्ली उडवून त्यांना नकारताना पहिले आहे. आजची तरुण पिढी अशी दिसण्यावरून मुलगी पसंत करते, हे सत्य कुठेतरी खटकते नाही का..?? पण हे खूप मोठं सत्य आहे आजही, काही ठिकाणी मुलींचा बाजार मांडल्यागत मुली दाखवल्या जातात किंवा स्वत: साठी पसंत तरी केल्या जातात..

काही मुलं तर सरसकट त्या मुलीच्या तोंडावर सांगतात, मला stylish बायको हवी आहे तू फार साधी दिसते किंवा मला गोरीच हवी, तू सावळी आहे किंवा तू अमुकतमुक शहरात शिकायला होती,तिथे म्हणे प्रत्येकाचे काही ना सुरूच असते..!! मुलगी पहायला चाललोत दुकानातून बाहुली विकत आणायला नाही, हे प्रत्येक मुलांनी लक्षात ठेवावे. नाही का..?

ह्या सर्व रूढीना मुलीनी विरोध करू द्या, तिच्या बद्दल च्या अफवा क्षणात वातावरण गंभीर करतात. तिचं बाहेर काही तरी सुरु आहे पासून तिची कीर्ती सुरु होते ते आईचे संस्कारच अशे पर्यंत गरज नसताना विषय ताणला जातो.

माझा लग्न,रूढी,परंपरा ह्या गोष्टीना विरोध नाही, फक्त एखादी मुलगी पहायला जाताना किंवा बघताना तिचा आदर करायला शिका..!! नाही ना आवडली तुम्हाला ती, शांततेने, आदराने नकार कळवा..!! तिचा अपमान करायचा, तिच्या चारित्र्यावर शंका घ्यायचा हक्क तुम्हाला कुणीही दिलेला नाही..!! बाजारातील बाहुली पाहतोय हा समज ठेवून स्वत:ची अर्धांगिनी शोधली जाते, म्हणूनच कदाचित घटस्फोट वाढत असलेले दिसतात..!!

ही मुलगी बघण्याची प्रथा एकाऐकी थांबवता येणार नाही, पण जर तुम्ही स्वत:साठी सहचारिणी शोधत असाल तर कमीत कमी एक माणूस म्हणून माणसाचा शोध घ्या..!!   


  

Sunday 16 March 2014

चूक नाही त्यात हेच मी समजत गेली..!!

प्राण कंठाशी आणून प्रतीक्षा केली गेली
चूक नाही त्यात हेच मी समजत गेली..!!

माझे अगदीच निरागसतेने आपले मानणे  
खटकतय तुला हेच उशिराने मी उमजली..!!
चूक नाही त्यात हेच मी समजत गेली..!!

वाढतात हृदयाचे ठोके तुझ्या नावाने 
पण ही तर सवय नेहमीची झाली..!!
चूक नाही त्यात हेच मी समजत गेली..!!

भेटायचे ठरले जरी, सजायची उत्साहाने
तसही तेव्हा स्वभावाची वेगळी बाजू उमगली..!!
चूक नाही त्यात हेच मी समजत गेली..!!

नाहीच मुळात आवडले मैत्रिणीचे उचकावने
समजेना,तिला का शंकेची इंगळी डसली..!!
चूक नाही त्यात हेच मी समजत गेली..!!

आपल्या दोघात निखळ मैत्री जपली आग्रहाने
लोकांनी तिथेही किती प्रश्ने विचारली..!!
चूक नाही त्यात हेच मी समजत गेली..!!

“आता लगेच येतो” म्हणत तुझे निघून जाणे
जगाला तू भ्यायल्यायची चाहूल मला लागली..!  
चूक नाही त्यात हेच मी समजत गेली..!!

परतणार नाहीस हा विश्वास खोटा ठरणे
पुन्हा नव्याने प्रेमा व्यतिरिक्त नाती जुंपली..!!
चूक नाही त्यात हेच मी समजत गेली..!!

Saturday 8 March 2014

मत दे यार..!!

लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यात, प्रत्येक न्यूज channel वर चर्चेच्या नावाखाली चाललेली वाद माझ्यासारख्या पहिल्यांदाच स्वत:चे मत देणाऱ्या तरुणांसाठी किती उपयोगाचे ठरते हे विचार करण्या सारखे..! कुठलं सरकार निवडून द्यायचे यासाठी प्रत्येकाचं मत महत्वाचे  असते,अशात ह्या चर्चा (वाद-विवाद) आम्हाला जास्त संशयात टाकतात..!

आपलं मत कुणाला द्यायचं हे ठरवताना आधीच बोचाकळ्यात पडलेल्या तरुणांना अधिकच बोचाकळ्यात पडतात ती घोषनापत्रे आणि भाषणे..!!

आणि आश्चर्य वाटू नये,पण काही घोषणा पत्रातील तरतुदी मला हसू कि रडू या मन:स्थितीत टाकतात.

स्त्रियांच्या सुरक्षतेताच मुद्दा जो खर तर या वर्षात झालेल्या बलात्कारा मुळे उघडकीस आला. किती घोषणापत्रात याचा उल्लेख तरी केला  आहे..?? काहीच मोजक्या पक्षांनी या मुद्द्याला प्राधान्य दिले आहे.ज्या पक्षांना स्त्रियांचे महत्व, त्यांची सुरक्षितता,त्यांचा आदर वैगेरे गोष्टी समजतच नाही (ज्यांनी उल्लेख केला त्यांना समजतेच असे नाही,पण कमीत कमी त्यांनी हा मुद्दा गरजेचा आहे हे जाणले हे तरी प्रशंसनीय आहे) त्या पक्षाला मत देताना मीही जरा विचारच करेल, इतक्या गंभीर विषयाकडे कुणी दुर्लक्ष कसे करू शकते..!!


भारतात बेरोजगाराचे प्रमाण वाढते आहे (सध्या मीही एक बेरोजगार आहे). अश्यात बेरोजगारांची क्षमता,कौशल्य वाढवून त्यांना रोजगाराची ग्वाही देणाऱ्या पक्षाकडे कौल जाणे योग्य आहे पण ही आता स्वयंरोजगाराची दिली जाणारी वचने वचनेच राहिली तर..? हा प्रश्न जास्त भेडसावतो..!! त्यात भर म्हणून एका घोषणापत्रात तर चक्क असे वाचायला मिळाले कि, पदव्युत्तर बेरोजगार व्यक्तीला ३०००/- रुपये बेरोजगारी भत्ता दिला जाईल, म्हणजे आधीच व्यक्ती बेरोजगार त्यात घरी बसल्या-बसल्या भत्ता मिळतो म्हणजे आता आळशीही व्हायला मुक्त..!!

आणि काय तर म्हणे भारत कृषिप्रधान देश आहे..!! काय आहे या देशात शेतकऱ्यांची स्थिती...?? देशाला अन्नपुरवठा दाताच धड दोन वेळचे पोट भरून जेवू शकत नाही. वाढत्या महागाईत शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा म्हणून त्यानाच धोरणे करावी लागतात यापेक्षा कृषिप्रधान भारताची शोकांतिका कुठली असू शकते..??

अशी एक ना अनेक मुद्दे, जे फक्त घोषणा पत्रात आणि दिलेल्या भाषणात वापरली जात असली तरी ती कित्ती प्रमाणात आचारली जातात हा प्रश्न तो प्रश्नच उरतो..!!

या वेळी पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाचे योगदान देणाऱ्या माझ्या सारख्या तरुणांना माझी विनंती आहे, थोडे कान-डोळे उघडे ठेवून मतदान द्या,सुट्टी आहे म्हणून दिवस मज्जेत घालवण्यापेक्षा मतदानात सहभागी व्हा..!! तुमचे मुद्दे आपले समजून मांडणाऱ्या, तुमच्या सुरक्षितता,उदरनिर्वाह अधिक सोयीस्कर करणाऱ्या उमेदवार,राजकीय पक्ष ओळखून मतदान करा..!!

स्त्री-सुरक्षा,बेरोजगारी,नैसर्गिक आपत्ती,वाढती महागाई,आपसी मतभेद अश्या सर्वच समस्यांवर मात करून तरुणांनीच भारताचा प्रगत देश बनविण्याचा विडा उचलायचा आहे आणि चला त्याची सुरवात आपले अमूल्य मतदान योग्य पक्ष/नेत्याला देऊन करूया..!!
  


Monday 3 March 2014

आता वाईट तरी कशाचे, वाटून घेतोय तू..??

ही काय स्थिती, स्वत:ची केलीस तू...??
आता वाईट तरी कशाचे, वाटून घेतोय तू..??

तक्रार नव्हती ,प्रश्न होता विचारला,
इतकेही, समजू शकला नव्हतास तू..??

मनातले, जशेच्या तशे, अगदी स्पष्ट, 
कधीतरी बोलायला, शिकशीलच तू ..!!

थोडा फरक, नक्की पडतोय ह्या बदलाचा,
अस्वस्थता,खोट्या हसण्यात झाकतोय तू..!!

कुठली तरी सल, छळते आहे बहुदा,
न मागताच कारण, सल्ले देतोय तू..!!

थोडी आता, पटतेय म्हणे मी तुला, 
अफवाच ना ही..!! का सहन करतोय तू..??

दुख: असेल कुठले तर, सांगून टाकावे लवकर,
पण इतक्यात म्हणे, मनात, मला लपवतोय तू..??