Friday 28 December 2012

एक चळवळ मनातली



माणुसकी पेरून  बघितली, घेऊन  हि माती
अपयशाचे पीक आले, भरपूर आमच्या हाती.
आशेच्या किरणात, आला विदर्भी उन्हाळा कुठून
राखेत आता या शोधतो, काय  राहिले उरून ?
वैचारिक  शेतीत  या, घाम गाळला होता आम्ही एवढा
"साकी " च्या डोळ्यात जाम नसेल कोणी पाहिला तेवढा.
मशाली पेटवून हाती, उजेडाचे स्वप्न होते पाहिले,
डोळेच न उघडले कधी, अन  सगळे प्रकाश समजत राहिले.
अपयशाचा कळस आमचा, असा गेला उंचावरी,
अवस्था तशीच आमची, जसा कास्तकार कर्जबाजारी.
विरंगुळा समजूनच वाचा माझ्या  कविता
घुसवू नका डोक्यात, सांगतो तुमच्या हिता.
मूर्खपणा करून  असा, काय भले होणार मोठे
म्हणाल तुम्हीच उद्या, लिहिले  होते यानी, आता हान्हा "वैभवा" गोटे..!!


सौजन्य: 

 वैभव गुणवंत भोयर

(vgb3333@gmail.com)

No comments:

Post a Comment