तू आलास-
हसवलं,खेळवलं,
मला जणु परिसच भेटलं
लोखंडातून सोनं केलस..!
आणि
निघुन गेलास..!
जायचच होत तर-
आलासच का..??
जाताना आठवणी ठेवुन गेलास..!
तेवढ्या त्या तरी घेउन जायच्या असत्या..
पण..
नाही..!!
मला ताटकळत ठेवुन
निघुन गेलास..!
वाटलं नव्हतं,
आयुष्यात पुन्हा..
एका वळणावर भेट होइल
मुकं मुकं राहुण भावना पोहचतील
तू
पुन्हा दिसलास
त्या आठवणी उलगडल्या..
पण
तू मात्र,
एकही शब्द न बोलता,
पुन्हा
निघुन गेलास..!
मिहि का अशी..??
अनोळखी झाली..??
हि सल मारुन टाकेल कदाचित..!!
तू
मुकपणे निघुन गेलास..!,
हरकत नाही..!
पुन्हा येउ नकोस,
आणि जर यायचचं असेल तर-
एक अनोळखी बनून ये..!!
कारण..?
तू कोण.?
तुझं अस्तिस्त्वच मिटून टकलय मी..!!
No comments:
Post a Comment