जुळलेच जे नाही नाते,ते मी तुटले म्हणाले..
सर्व कधीच संपले होते हे निघताना मज कळाले..!!
मागे काही बाकी नव्हते,तरीही पाय घोटाळले,
मी निघताना म्हणे तुझे अश्रू होते वितळले..!!
माझ्या चुकांचा हिशोब, मी मागणारच होते,
पण गैरसमज तू सर्व, होते तेव्हा निवळले..!!
विसरून सर्व आता,पुढे चालायचे होते ठरवले,
पण मी निघताना होते तू "थांब जराशी" म्हटले..!!
म्हणून या वळणावर, रस्ते असावे संपले,
शब्दाखातर तुझ्या, मी थोडे वळून बघितले..!!
No comments:
Post a Comment