Saturday 12 January 2013

फक्त बोलायचं


बोलायचं जे वाटते ते,त्यानी मन हलक होतं आणि माणसं जवळ येतात. आपल्याला वाटणाऱ्या भावना शब्दात जमवाजमव करून,बोलायचं..!सुरवातीला जमणार नाही, ह्रदयाची धडधड वाढेल, काही वेळेला डोळ्यातून पाणीही येईल, येऊ द्यायचं कारण आपल्या भावनांवर ताबा ठेवून त्यांना बोलकं करायचा आपला प्रयत्न सफल व्हायचे ते लक्षण असतात..

एकदा जे वाटते ते बोललात की बघा कसं हलकं वाटेल मोरपिसासारखं हलक..!! आपले विचार आणि आपण ही जरा जरा उडायला लागू..!!आणखी नवीन भावना, नवीन संवेदना, नवीन वेदना आपल्या मध्ये निर्माण व्हायला लागेल.. नावीन्याचा अनुभव येईल.. आयुष्यात बदल जानवेल,उत्साह ओथंबून वहायला लागेल..!! हा अनुभव चांगला असेल,खुप चांगला..!! फक्त बोलायला शिका.!! मी शिकली एवढ्यातच,एकदा तुम्ही प्रयत्न करुन बघा..!!

आणि जेव्हा फक्त बोलायचं असते तेव्हा समोरच्याचा RESPONSE खरच कधीच MATTER करत नाही..!!

No comments:

Post a Comment