Saturday 16 March 2013

मातीचा गंध

"माझी तहान भागाव" असा आक्रांत 
उर फोडून जमिनींनी मांडल्यानंतर,

जिवंत पणातही,मेल्याहून मेल्याची 
भावना देणाऱ्या दुष्काळानंतर,

निर्भीड मनातही चर्रर्र करणाऱ्या 
ओसाड आणि कोरड्या ॠतुनंतर,

वाहनांचा पूर आणि कारखान्यांच्या धुरात 
जीव गुदमरल्यानंतर,

प्रत्येक बिकट परिस्थितीत 
संयमाची परीक्षा घेतल्यानंतर,

निराशा आणि अपयशात-
खचत चाललेल्या जीवनाला,
जगण्याची नवी उमेद देणारा..!!

पहिला वाहिला-
दूर डोंगरावर येउन गेलेल्या,
हलक्या सरींमुळे-
सर्वत्र,
मंद-मंद दरवळलेला-
"मातीचा गंध..!!"

No comments:

Post a Comment