आपल्या नात्याला,
कुठल्या गैरसमजीने दुरावा आला..??
कारणमीमांसा नकोच..!
एकाच घरात वावरणारी,
अनोळखी झालोत, नाही..?
सावली म्हणायचा तू मला
तुझ्यापासून कधीही वेगळी न होणारी-सावली..!
पण इतक्यात-मुद्दाम होऊन दूर राहतोय
वेदना होतेच,
आणि का होऊ नये.?
दोन जीव,एक प्राण वैगेरे होतो ना रे आपण..!!
......
दिवाळी! नाही का आज,
सर्व गिलेशिकवे विसरून-
तुझ्या मिठित येईल म्हणते..!
पण मीच का..?
कदाचित,
तुही याच द्विधा मनःस्थितित..!
.....
फटाक्यांची आतिषबाजी बघायला
सवयीप्रमाणे दोघेही गच्चीवर,
अमावस्येला, संपूर्ण शहर उजळून निघाले आहे..!
विरहात दोघे..!!
तेव्हा नेमका कुणीकुणाचा हात पकडला
ते माहीती नाही,
पण,
गुंफलेले हात बघून,
कोपर् यातली पणती हळूच हसली,
तेवढं नक्की आठवते..!!
khup surekh.
ReplyDelete