Monday 15 December 2014

काश ये पल थम जाये..।

आज, त्याला भेटली ती आणि खूप बोलली, सर्व गोष्टी सांगितल्या..!! कितितरी विषयांवर चर्चाही केली, भूतकाळाच्या गाठी उलगडल्या, वर्तमानात येऊन अस्तित्वही बघीतलं, भविष्याचा वेध घेतला..!! जे बोलायचं ते सर्व,अगदी स्पष्ट बोलली..!
आणि, आता निघायची वेळ आली. ती आली तिथेपरत जाणार,त्याचही तसचं..
हे अशे एकमेकांना सोडून (नेहमीसाठी नसतं ते पण तरीही) जाणं, तिला रुजायचं नाही...
कितिही नाही म्हटलं तरी हृदयाचे ठोके वाढतात..! त्याला पुन्हा भेटता नाही आलं तर, नको त्या शंका आणि विचार नुसते..!

ती विचारते स्वतःला, हा वेळ इथेच थांबवता आला तर... मन दटावून बोलतं तिचं, "नाही.. बिलकुल नाही... गती आहे जगण्याला म्हणून भेटण्याची उत्सुकता आणि निघतानाची हूरहूर असते..! खरी मजा इथेच आहे आणि हाच वेळ थांबला तर, तोच-तोचपणा जाणवेल.. तिला भेटताना प्रत्येकदा तो वेगळा असतो - आधीपेक्षा खूप वेगळा...! हा वेगळेपणा अनुभवण्यासाठी तरी वेळ थांबायला नको आहे... तिच्या मनाच्या या शहाणपणाच्या गोष्टीचं तिलाही नवलच वाटलं ( मन समजदार झालं होतं म्हणा ना तिचं)...
निरोप घेताना पावलं जड झाली.. डोळ्यात पाणी आलं (नेहमीसारखचं, नवीन नव्हतं त्यात काही..!), त्याला ती दिसू नये म्हणून ती जरा धावत जाऊन (गरज नसतानाही) बस पकडते..तोही गाडी चालू करून निघून जातो..
.....
त्याच्या मनाचा कधीच थांगपत्ता लावता येत नाही, निघताना त्याच्या मनात काय विचार असतील, की तोही फक्त हसत असेल, जशी ती सौम्य हसत बसमध्ये बसली होती..

...वैष्णवी..

No comments:

Post a Comment